![]()
चंद्रपूर जिल्हा:- बल्लारशाह व्हाया वर्धा मुंबई चंद्रपुर जिल्हातुन मुंबई ला जानारी एकमेव ट्रेन बल्लारशाह सेवाग्राम लिंक एक्सप्रेस दोन वर्षा पासुन बंद आहे. चंद्रपुर व गडचिरोली जिल्हातील हजारो प्रवाश्यांना वर्धा, अमरावती,अकोला,शेगांव, शिर्डी, नाशिक, त्रिंबकेश्वर, मुंबई ला जाण्याकरीता सोईची होती ती अध्याप बंद आहे.
![]()
![]()
त्यामुळे लोकांना नागपुर ला जावे लागते त्यात पैसा व वेळ विनाकारण वाया जात असल्याने हजारो प्रलाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे हि बाब लक्षात घेत बल्लारपूर शहरातील झासी राणी सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत या वर ताबडतोब योग्य प्रकारे कार्यवाही करुन हि ट्रेन परत
नविन वर्षाच्या आधी सुरू करण्यात यावी अशी विनंती केली आहे.


