राजु कांबळे
आवाज 24 न्यूज
समुद्रपूर तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर. : (दि.27) निसर्गाने काल केलेल्या अतिवृष्टी कहर आणि मुसळधार, विजांचा कडकडाट,वादळ, भतीवह वातावरण मुळे शेतकरी बांधवांना सहन करावा लागला आणि त्यातही भरपूर आर्थिक नुकसान देखील सोसावं लागत आहे.
खंडाळा येथील शेतकरी संदीप दिनकरराव झाडे व सागर दिनकरराव झाडे या दोन्ही बंधूचे तीन बैलांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. चौथा बैल थोडक्यात बचावला.
पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण तुराळे व तलाठी गजानन ठाकरे यांनी पाहणी करून पंचनामा करण्यात आला.या दोन्ही शेतकरी बांधवांनी सरकारला आकस्मिक, नैसर्गिक,नुकसान भरपाईची मागणी केली आहे


